प्रथम पल्लवी बागूल, द्वितीय क्रमांक जयश्री पाटील यांनी पटकावला
खबरीलाल- अमळनेर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे स्त्रीचे बदलते स्वरूप या विषयावर वत्कृत्त्व स्पर्धा घेण्यात आली. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत मनोगत व्यक्त केले.
माजी आमदार स्मिताताई वाघ, माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील, मंचाच्या अध्यक्षा डॉ. अपर्णाताई मुठे, उपाध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील उपस्थित होत्या. तयारीचे भाषण आणि तीन मिनीट उत्स्फूर्त भाषण अशा दोन फेऱ्यात स्पर्धा झाली. स्पर्धा राजश्री पाटील आणि कल्याणनी पाटील यांनी प्रायोजित केली. वत्कृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पल्लवी बागूल, द्वितीय क्रमांक जयश्री पाटील, तृतीय क्रमांक अपेक्षा सोमवंशी आणि उत्तेजनार्थ भारती गाला, शिल्पा , जैन यांना मिळाला. सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी जस्मिन भरूचा, विद्या हजारे, माधुरी पाटील, पद्मजा पाटील करूणा सोनार, नयना कुलकर्णी, सरोज भांडारकर यांनी केले. रंगारंग नृत्य सादर केले. प्रास्ताविक नयना नवसारीकर यांनी केले. अहवाल वाचन सूचिव सरोज भांडारकर यांनी केले. आभार डॉ ज्योती राणे यांनी मानले. सूत्रसंचालन पूजा शहा यांनी केले. स्पर्धेचे नियम व अटी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले. परीक्षक म्हणून लीलाधर पाटील, सारांश सोनार यांनी काम पाहिले. परिक्षकांनी वत्कृत्व कले संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. ज्योती राणे, डॉ. मंजिरी कुलकर्णी, पूजा शहा आदींनी परिश्रम घेतले.